अर्थ नसे ज्या शब्दांना
ते उगाच बोलू लागतात
दोन अनोळखी जिवांना
एकमेकांत गुंफू पाहतात
बांध सुटून भावना
शब्दांतून ओसंडून वाहतात
आवडीला बहर येउन
नाजूक बंध जुळतात
स्पंदनांना साथ देत
दिवसामागे दिवस सरतात
शब्द संपतात, धागा तुटतो, क्षणार्धाच नातं ही तुटतं
वाईट वाटतं, त्रास होतो, डोळ्यांमधलं पाणी हि आटतं
शेवटी शब्द मुके होऊन हरवून जातात
मनाच्या कोपरयात मात्र आठवणी तशाच राहतात