aathwani-tashach-rahtat

आठवणी तशाच राहतात

अर्थ नसे ज्या शब्दांना
ते उगाच बोलू लागतात

दोन अनोळखी जिवांना
एकमेकांत गुंफू पाहतात

बांध सुटून भावना
शब्दांतून ओसंडून वाहतात

आवडीला बहर येउन
नाजूक बंध जुळतात

स्पंदनांना साथ देत
दिवसामागे दिवस सरतात

शब्द संपतात, धागा तुटतो, क्षणार्धाच नातं ही तुटतं
वाईट वाटतं, त्रास होतो, डोळ्यांमधलं पाणी हि आटतं

शेवटी शब्द मुके होऊन हरवून जातात
मनाच्या कोपरयात मात्र आठवणी तशाच राहतात

Nishabd-Logo
प्रतिक अक्कावार

शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *